तंटामुक्त गाव समिती ही ग्रामस्तरावर स्थापन केलेली एक महत्त्वाची समिती आहे. याचा उद्देश ग्रामस्थांमधील वाद-विवाद स्थानिक पातळीवरच सामोपचाराने मार्गी लावणे हा आहे. ही समिती गावातील सौहार्द, शांतता आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी कार्य करते.
गावातील नागरी वाद, कौटुंबिक तंटे, शेजारी वाद, आर्थिक व्यवहारातील लहान-मोठे गैरसमज इ. प्रकरणांचे निपटारा सामोपचाराने करणे.
न्यायालयीन प्रक्रिया टाळून स्थानिक पातळीवर तंटे सोडवून वेळ व आर्थिक खर्च वाचवणे.
गावात शांतता, सौहार्द व एकी राखणे.
सामाजिक बंध वाढवून सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देणे.